Prime Minister Modis Welfare Programs Have Brought Millions Into The Mainstream
‘मोदींनी लाखो लोकांना मुख्य प्रवाहात आणले’
महाराष्ट्र टाइम्स•
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. मोदींनी लाखो लोकांना आर्थिक सुधारणांद्वारे मुख्य प्रवाहात आणले आहे. कल्याणकारी योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर त्यांचा भर आहे. यूपीआय आणि थेट लाभ हस्तांतरणासारख्या गोष्टींसाठी मोठी प्रेरणा लागते. ग्रामीण भागातील लोकांपर्यंत योजना पोहोचवण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मोदी सर्वसामान्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांनी आर्थिक सुधारणांमधून लाखो लोकांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले आहे, असे कार्नी म्हणाले. ऑस्ट्रेलियातील लोवी इन्स्टिट्यूटमध्ये बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मोदींच्या भारतभेटीनंतर कार्नी यांनी हे भाष्य केले.
कार्नी यांनी सांगितले की, "वैयक्तिक पातळीवर त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू आहेत. मला ते पूर्वीपासूनच माहित होते. परंतु, कालांतराने त्यांच्याशी होणारा संवाद कुतुहलाचा भाग ठरला आहे. लोकहिताचा विचार ग्रामीण घरापर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी खूप लक्ष केंद्रीत केले आहे."ते पुढे म्हणाले की, " आर्थिक सुधारणा , थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक परिवर्तन, यूपीआय आणि इतर गोष्टींसाठी एक मोठी प्रेरणा लागते. थेट व्यक्तींपर्यंत पैसे पोहोचवणे महत्त्वाचे असते. लाखो लोकांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते." कार्नी यांनी हे मुद्दे लोवी इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या संवादादरम्यान मांडले. कॅनडाचे पंतप्रधान २७ फेब्रुवारी ते २ मार्च या काळात भारतात आले होते.