विजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचे बक्षीस

महाराष्ट्र टाइम्स

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-२० विश्वचषक जिंकलेल्या संघाला १३१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम खेळाडू आणि सहायक वर्गामध्ये विभागली जाईल. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंना सर्वाधिक वाटा मिळेल. न्यूझीलंडवर ९६ धावांनी मिळवलेल्या विजयानंतर भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. ही ऐतिहासिक कामगिरी आहे.

team india awarded 131 crores bcci announces increased prize money
टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारतीय संघावर बक्षीसांचा वर्षाव झाला आहे. न्यूझीलंडला हरवून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाला, बीसीसीआयने तब्बल १३१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ही रक्कम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) दिलेल्या रकमेपेक्षा तब्बल पाच पट जास्त आहे. खेळाडू आणि सहायक वर्ग यांच्यात ही रक्कम वाटली जाणार असून, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि खेळाडूंना सर्वाधिक वाटा मिळणार आहे. सहायक वर्गाला त्यांच्या पदभारानुसार रक्कम दिली जाईल.

मागील वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने १२५ कोटी रुपये जिंकले होते. यंदाची रक्कम त्यापेक्षा ६ कोटी रुपयांनी जास्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ खेळाडूंना प्रत्येकी ६ कोटी रुपये मिळतील. उर्वरित ४१ कोटी रुपये प्रशिक्षक आणि इतर सहायक कर्मचाऱ्यांमध्ये वाटले जातील.
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी खेळाडू आणि सहायक वर्गाचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले आहे की, ‘बीसीसीआय या ऐतिहासिक कामगिरीबद्दल खेळाडू, सहायक वर्गातील सदस्य आणि निवड समिती सदस्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते; तसेच भविष्यातील सातत्यपूर्ण यशासाठी या सगळ्यांना शुभेच्छाही देत आहे.’

भारताने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने टी-२० क्रिकेट वर्ल्ड कपचे जेतेपद कायम राखले. विशेष म्हणजे, टी-२० वर्ल्ड कपचे जेतेपद राखणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे. टीम इंडियाने तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली असून, टी-२० क्रिकेटमधील भारताचा दबदबा यातून स्पष्ट होतो.

या स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून भारताने विश्वविजेतेपद मिळवले. ही भारताची टी-२० वर्ल्ड कपमधील तिसरी विजेतेपद ठरली. याआधीही भारताने टी-२० क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.