‘पतीच्या मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने मला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो दाखला मिळाला नसल्याने मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला सध्या माझी वृद्ध आई व नातेवाईक यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता व दुर्लक्ष यामुळे सन्मानाने जगण्याचा माझा हक्क हिरावला जात आहे. हद्दीचे कारण देत शासकीय प्रशासनांनी घेतलेली ही भूमिका अन्यायकारक व मनमानी स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रशासनांना योग्य ते निर्देश द्यावेत,’ असे म्हणणे सुनयना यांनी याचिकेत मांडले आहे.








