याचिकेत म्हणणे काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पतीचे मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने सुनयना यांना मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांना नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे सन्मानाने जगण्याचा हक्क हिरावला जात आहे. प्रशासनाची ही भूमिका अन्यायकारक असून, त्यांना योग्य निर्देश देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

facing mental distress due to unavailability of husbands death certificate

‘पतीच्या मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने मला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तो दाखला मिळाला नसल्याने मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मला सध्या माझी वृद्ध आई व नातेवाईक यांच्यावर अवलंबून राहावे लागत आहे. संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता व दुर्लक्ष यामुळे सन्मानाने जगण्याचा माझा हक्क हिरावला जात आहे. हद्दीचे कारण देत शासकीय प्रशासनांनी घेतलेली ही भूमिका अन्यायकारक व मनमानी स्वरूपाची आहे. त्यामुळे प्रशासनांना योग्य ते निर्देश द्यावेत,’ असे म्हणणे सुनयना यांनी याचिकेत मांडले आहे.