यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गायमुख घाट रस्त्याच्या कामात विविध यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतो. हा रस्ता ठाणे आणि मीरा-भाईंदर पालिका हद्दीत विभागलेला आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत होता. आता दोन्ही पालिकांवर जबाबदारी आहे. एमएमआरडीए भविष्यात या रस्त्यांवर काम करणार आहे. काही भाग वनविभागाच्या हद्दीत असल्याने अडचणी येत आहेत.

lack of coordination in important roads for thane mira bhayander

मुख्यत्वे गायमुख घाट रस्त्याचा काही भाग ठाणे व काही भाग मीरा- भाईंदर पालिकेच्या हद्दीत येतो. याआधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याची डागडुजी करण्यात येत होती. त्यानंतर गेल्या वर्षी ठाणे आणि मीरा - भाईंदर महापालिकेला या रस्त्याच्या कामाची जबाबदारी देण्यात आली. एमएमआरडीएच्या वतीने भविष्यात या रस्त्यांवर विविध कामे केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. येथील काही भाग वनविभागाच्या हद्दीत येतो. त्यामुळे विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव दिसून येतो.