छत्रपती संभाजीनगर : शेतजमिनीच्या वादातून ५५ वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी वाद घालून मारहाण केली. ही घटना गंगापूर येथील टोकी येथे नऊ जूनला रात्री अकराला घडली.
या प्रकरणी बाबासाहेब लक्ष्मण भुसारे (वय ५५, रा. टोकी, ता. गंगापूर) यांनी तक्रारीनुसार, शेतजमिनीच्या वादातून त्यांच्या घराच्या समोर त्यांचे पुतणे शुभम बाळू भुसारे व रितेश बाळू भुसारे, तसेच भावजयी पुष्पा बाळू भुसारे आले. त्यांनी आधी शिवीगाळ करून वाद घातला. यानंतर पत्नी व मुलाला मारहाण केली. तसेच शुभम व रितेश या दोघांनी लाकडी दांड्याने बाबासाहेब भुसारे यांना मारहाण करून जखमी केले, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात मारहाण करणाऱ्या शुभम बाळू भुसारे, रितेश बाळू भुसारे, पुष्पा बाळू भुसारे (सर्व रा. टोकी ता. गंगापूर) या तिघांच्या विरोधात एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार गिरी तपास करीत आहेत.







