सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची वेळ होती. परंतु, वेळ संपल्यानंतरही अर्ज भरण्यासाठी उमेदवार रांगेत होते. अशा उमेदवारांना टोकन देण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी २५४ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची आज, बुधवारी छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारी आहे.






