मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) बुधवारी आणखी एक गुन्हा दाखल केला.
जीवन विमा महामंडळाच्या (एलआयसी) वतीने करण्यात आलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, खोट्या कागदपत्रांच्या आधारे रिलायन्सने गुंतवणूक करण्यास भाग पाडून ३,७५० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिलायन्सचे अनिल अंबानी आणि इतर अधिकाऱ्यांना यामध्ये आरोपी करण्यात आले आहे.





