सुकामेव्यालाही महागाईची झळ

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
सुकामेव्यालाही महागाईची झळ
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
किराणा साहित्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे बजेट आधीच कोलमडले असताना, आता सुकामेव्याच्या दरवाढीनेही ग्राहकांच्या खिशावर भार वाढला आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच नाशिकच्या बाजारपेठेत बदाम , काजू , अंजीर, पिस्ता आणि खजूर यांसह विविध सुकामेव्याचे दर १५ ते ३० टक्क्यांनी वाढल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

स्थानिक बाजारपेठेत सुमारे ७० टक्के सुकामेवा आयात केला जातो. बदाम प्रामुख्याने अमेरिकेतून, तर पिस्ता आणि इतर प्रकारचा सुकामेवा इराणसह विविध देशांतून येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, वाढलेला वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे आयात खर्च वाढला आहे.
गेल्या काही दिवसांत बदाम प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांनी, काजू ९० ते १०० रुपयांनी, तर खजूर सुमारे १४० रुपयांनी महागला आहे. रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत मागणी वाढणार असल्याने ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

सुकामेव्यालाही महागाईची झळ