मुंबई : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा ‘ ऑपरेशन टायगर ’च्या चर्चेला चर्चेला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाच्या नेतृत्वाने पक्षांच्या खासदारांची मानसिकता तपासण्यासाठी व सद्य राजकीय परिस्थितीवर खासदार व उद्धव ठाकरे यांच्यात मननोकळा संवाद व्हावा यासाठी रविवारी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलाविली. मात्र, या बैठकीला पक्षाच्या नऊ खासदारांपैकी चारच खासदार उपस्थित राहिले. उर्वरित खासदारांनी ऑनलाइन हजेरी लावली. त्यासाठी विविध कारणे खासदारांनी दिली.
सविस्तर वृत्त...८




