तज्ज्ञांच्या मते, हा बदल महत्त्वाचा आहे. कारण भाषा जपण्याच्या प्रश्नाने आता आधुनिक माध्यमांत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.मुंबईसारख्या सतत बदलणाऱ्या शहरात सोशल मीडियावर मराठी दिसणे, ऐकू येणे आणि चर्चेत राहणे हा प्रवाह लक्षवेधी ठरत आहे. भाषेचा प्रश्न केवळ विशिष्ट ओळखीचा नाही, तर सहअस्तित्वाचाही आहे, असे निरीक्षण काहींनी नोंदवले आहे.






