मंत्रिमंडळातही बदल?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांचा कार्यकाळ अवलंबून असेल. जर फेरबदलाला मंजुरी मिळाली, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील. यामुळे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आशांना तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता आहे. हा निर्णय पक्षातील अंतर्गत राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो.

possibility of changes in congress cabinet discussions ongoing on shivakumars plan

पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बाजूने असताना, पक्षाने आधी नेतृत्वबदलावर निर्णय घ्यावा, असे शिवकुमार यांना वाटते. त्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ फेरबदलास मंजुरी दिल्यास, विद्यमान मुख्यमंत्री पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असा संकेत मिळेल. याचाच अर्थ शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदावर बसण्याची आशा तूर्तास पूर्ण होणार नाही, असे मानले जात आहे.