कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या विदेश दौऱ्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीस मंजुरी दिली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील शेतीप्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळणार आहे. मागील दोन वर्षांपासून निधीअभावी हे दौरे रद्द झाले होते. आता शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान शिकायला मिळेल.
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना परदेशातील शेतीचे नवनवीन प्रयोग पाहता यावेत, यासाठी कृषी विभागाने १ कोटी २० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीमुळे दोन वर्षांपासून रखडलेले शेतकऱ्यांचे परदेश दौरे पुन्हा सुरू होणार आहेत.
कृषी विभागाने सोमवारी या निधी वितरणास हिरवा कंदील दाखवला. यामुळे यंदा शेतकरी परदेशात जाऊन आधुनिक शेती तंत्रज्ञान शिकू शकतील. यापूर्वी निधी उपलब्ध नसल्यामुळे दोन वर्षे शेतकऱ्यांचे परदेश दौरे होऊ शकले नव्हते. आता मात्र या दौऱ्यांसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.