अवकाळीचा निधी नाहीच

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे कन्नड तालुक्यात मोठे नुकसान झाले. मात्र, नुकसानभरपाईसाठी शासनाने जाहीर केलेल्या निधीतून तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. अपेक्षित निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. या निर्णयामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे चित्र आहे.

compensation denied for early rains damage in kannad taluka

कन्नड : मार्च २०२६मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी निधी वितरित करण्याचा शासन निर्णय १८ मे २०२६ रोजी घेण्यात आला आहे. यामध्ये कन्नड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही तालुक्याचा समावेश नसल्याचे दिसून आले. अपेक्षित निधी दोन कोटी १६ लाख ५५ उपलब्ब झाला नसल्यामुळे सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून आले आहे.

कन्नड तालुक्यात मार्च २०२६मध्ये तीन हजार २७५ शेतकऱ्यांचे एक हजार५४१.९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये जिरायत ५४३.५० हेक्टर, बागायत ९८३.५९ हेक्टर व फळबागांचे १४ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. यासाठी अपेक्षित निधी दोन कोटी १६ लाख ५५ हजार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे.