राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत २०२५ च्या राज्यस्तरीय विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत ३१ मार्च रोजी संपणार होती.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी , संस्था आणि कृषी विस्तारकांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांनी गौरविले जाते. कृषी विभागाने अर्ज प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. कृषी विभागाच्या https://krishi. maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ‘ कृषी पुरस्कार ’ या विभागात प्रस्ताव सादर करता येतील.



