वन्यजीवाच्या हल्ल्यातमहिलेचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात धनेगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली. मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या ५२ वर्षीय साधना सीताराम उईके यांचा वन्यजीवाने हल्ला करून बळी घेतला. त्यांचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला. नेमका कोणता प्राणी जबाबदार होता हे वनविभागाच्या तपासातून स्पष्ट होईल. मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याचे हे एक उदाहरण आहे.

वन्यजीवाच्या हल्ल्यातमहिलेचा मृत्यू

भंडारा : मोहफुले वेचण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तुमसर तालुक्यातील धनेगाव येथे घडली. साधना सीताराम उईके असे मृत महिलेचे नाव आहे. साधना उईके या शुक्रवारी सकाळी ९.३० वाजतादरम्यान गावाशेजारील शेतशिवारात मोहफुले वेचण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, दुपार उलटूनही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. गावाजवळील जंगल शिवारात त्यांचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. साधना यांच्यावर नेमक्या कोणत्या वन्यजीवान हल्ला केला याविषयी संभ्रमक आहे. हल्ला करणारा प्राणी वाघ होता की बिबट्या, हे वनविभागाच्या पंचनाम्यानंतर आणि शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. मागील काही दिवसांत मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला आहे.