जळगाव : जिल्ह्यातील खडके बुद्रुक (ता. एरंडोल) येथे मध्य प्रदेशातील लहान मुलांसह २० मजुरांना सहा महिन्यांपासून डांबून ठेवून बळजबरीने ऊसतोड व शेतीची कामे करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी रणजित पवार आणि राजेश पवार (दोघेही रा. खडके बुद्रुक) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार गोरेलाल रामसिंग बारेला (वय ३०, रा. नेपानगर, जि. बऱ्हाणपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर २०२५ पासून मजुरांना अन्न-पाण्यावाचून ठेवण्यात आले. त्यांचे मोबाइल काढून घेऊन बाहेरील संपर्क तोडण्यात आला.





