‘ महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात जातिभेद मोडून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. त्यांच्या कार्याची दखल आजही जग घेत आहे. अशा महापुरुषांचे विचार समाजाला दिशा देणारे असून, आजच्या काळात त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे,’ असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
वीरशैव समाजाच्या वतीने आयोजित महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त ते बोलत होते.
या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर, भाजपचे शहराध्यक्ष अशोक लोढा, नगरसेवक शुभम धूत, बबनराव गोरे, राजेंद्र बनसोडे, निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, नगरसेवक राकेश जाधव, राणा चव्हाण आदी उपस्थित होते.








