पुणे : महाराष्ट्रातील सर्व रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलण्याची सक्ती करण्याचा निर्णय परिवहनमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, हीच भूमिका राज ठाकरे १९ वर्षांपासून मांडत आहेत. सत्ताधारी आज रस्त्यावर येत आहेत हे ढोंग आहे. असली स्टंटबाजी करण्याऐवजी त्यांनी मराठी शिकविले पाहिजे,अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी टीका केली. महाराष्ट्रात मराठी भाषाच चालणार, असाही त्यांनी इशारा दिला. मनसेच्या संघटनांच्या बैठका घेण्यासाठी ते पुण्यात आले असता त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.






