ऐनवेळी एसी लोकल रद्द होण्यामुळे प्रवाशांकडून एसी तिकिटाचा परतावा मागण्यात येतो. अशावेळी प्रवासी आणि तिकीट विक्री केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतो. हे टाळण्यासाठी तुम्हाला एसी लोकलने खरच प्रवास करायचा आहे का, तुम्हाला एसी लोकलचे तिकीट हवे आहे का, असे प्रश्न विचारून खात्री केल्यानंतरच कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना तिकीट देण्यात येते, असे हार्बर रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले.








