कबुतरांच्या थव्यांचा त्रास

महाराष्ट्र टाइम्स

अंबरनाथमध्ये कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेने कबुतरांना खाद्य देण्यावर बंदीचे फलक लावावेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई व्हावी. केवळ कागदावर मोहीम न राबवता प्रभावी अंमलबजावणीची अपेक्षा आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.

कबुतरांच्या थव्यांचा त्रास
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, अंबरनाथ पालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरांना खाद्य देणाऱ्यांविरोधात दंडात्मक मोहीम सुरू केली होती. मात्र, ही मोहीम अल्पावधीतच थंडावल्याने शहरातील विविध भागांत पुन्हा कबुतरांना दाणे टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू झाले आहेत.

अंबरनाथमध्ये कबुतरांची संख्या कमालीची वाढल्याने त्यांच्या विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत असून, नागरिकांमध्ये श्वसनविकारांसह विविध आजारांचा धोका वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात केवळ दंडाची घोषणा करण्याऐवजी पालिकेने कबुतरांना खाद्य देण्यास बंदी असल्याचे स्पष्ट करणारे फलक लावावेत आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. पालिकेने केवळ कागदावर किंवा काही दिवसांपुरती मोहीम राबविण्याऐवजी प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.