खतांचे उत्पादन देशात स्थिर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम आशियातील संकटातही देशातील खत उत्पादन स्थिर राहिले आहे. खरीप हंगामासाठी ३७ लाख टन युरियाची आयात केली जाईल. मार्च-एप्रिलमध्ये देशात ३७.४९ लाख टन युरियाचे उत्पादन झाले. एकूण ६२.३७ लाख टन खत उत्पादन झाले आणि १५.३९ लाख टन आयात झाली. यामुळे सुमारे ७८ लाख टन खतांची उपलब्धता सुनिश्चित झाली आहे.

fertility production stable urea import increased

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत खत उत्पादन स्थिर राहिले असून, सरकारने खरीप हंगामापूर्वी तुटवड्याची भरपाई करण्यासाठी ३७ लाख टन युरियाची आयात करण्याचे निश्चित केले आहे. मार्च-एप्रिल या कालावधीत देशांतर्गत युरिया उत्पादन ३७.४९ लाख टनांवर पोहोचले असून, ते गेल्यावर्षीच्या पातळीइतके आहे.

मार्च-एप्रिल दरम्यान एकूण देशांतर्गत खत उत्पादन ६२.३७ लाख टन झाले आणि आयात १५.३९ लाख टन होती. संकटाच्या परिस्थितीत खतांच्या उपलब्धतेत सुमारे ७८ लाख टनांची भर पडली. मार्चमध्ये १६.४९ लाख टन युरिया उत्पादन झाले.