उद् घाटन सोहळ्यामुळे वाहतूककोंडी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उद्‌घाटन सोहळ्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अनेक वाहने अचानक बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचे मोठे हाल झाले. लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या प्रवाशांनाही याचा फटका बसला. वीकेंड आणि सुट्ट्यांच्या गर्दीचा अंदाज घेऊन उद्‌घाटन लवकर करणे आवश्यक होते, असे वाहनचालकांनी सांगितले. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.

traffic congestion due to inauguration ceremony causes difficulties for commuters

(पान एकवरून) अंतरामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यातच ७० ते ८० वाहने नादुरुस्त होऊन बंद पडल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांचे अतोनात हाल झाले. नवी मुंबई येथून पुण्याला लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या प्रवाशांची गाडी नादुरुस्त झाल्याने बच्चेकंपनीचे हाल झाल्याचे सांगण्यात आले. कार नादुरुस्त झाल्याने बोनेट उघडून रस्त्यावर उतरावे लागल्याचे कराड येथे निघालेल्या प्रवाशांनी सांगितले. तर, वीकेंड आणि सुट्ट्यांमुळे वाहनांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन कनेक्टिंग लिंकचे उद्घा टन सकाळी लवकर करणे आवश्यक होते, असे मत सातारा येथे निघालेल्या वाहनचालकाने व्यक्त केले.