वाढत्या खर्चामुळे तरुणांनी फिरवली पाठ

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

वाढते इंधनदर, घटते उत्पन्न आणि मनुष्यबळाचा वाढलेला खर्च यामुळे तरुण पिढी पारंपरिक मासेमारी व्यवसायापासून दूर जात आहे. अनेक बोटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. मच्छिमारांना हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे. यामुळे मासेमारी व्यवसायाचे भविष्य धोक्यात आले आहे. या परिस्थितीवर तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

youth turns away from fishing industry

वाढते इंधनदर , घटते उत्पन्न आणि मनुष्यबळाचा वाढलेला खर्च यामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसायाकडे तरुणांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. इंधनदरवाढीमुळे अनेक बोटी सध्या किनाऱ्यावरच उभ्या आहेत. ‘दरवर्षीपेक्षा अधिक खर्च करूनही हातात काहीच पडणार नसेल, तर हा ताण किती दिवस सहन करायचा?’, असा सवाल मच्छिमार उपस्थित करत आहेत.