पश्चिम बंगालमध्येमंत्र्यांचे खातेवाटप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी खातेवाटप केले आहे. दिलीप घोष यांना पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाची जबाबदारी मिळाली आहे. अग्निमित्रा पॉल महिला व बालविकास विभागाच्या मंत्री झाल्या आहेत. अशोक किर्तनिया अन्न व पुरवठा विभागाचे कामकाज पाहतील. क्षुदिराम टुडू आदिवासी विकास आणि मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री आहेत.

cabinet portfolio distribution in west bengal new team of cm shuvendu adhikari

कोलकाता : पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी मंत्रिमंडळात खातेवाटप केले. वरिष्ठ नेते दिलीप घोष यांना पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाचा कार्यभार देण्यात आला अाहे. अग्निमित्रा पॉल यांना महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभाग खाते देण्यात आले, तर अशोक किर्तनिया यांच्याकडे अन्न व पुरवठा आणि सहकार विभाग सोपवण्यात आला आहे. क्षुदिराम टुडू यांना आदिवासी विकास, मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री करण्यात आले आहे. निसिथ प्रामाणिक यांच्याकडे क्रीडा खाते सोपवले आहे.