मुंबई : ‘सामन्यात तणाव असताना मैदानात काही गोष्टी घडू शकतात,’ अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.
आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये अंतिम टप्प्यात कमालीची चुरस निर्माण होते. अनेक अनपेक्षित निकाल लागतात. त्यातच खेळाडूंकडून काही वेळा आक्षेपार्ह वर्तणूकही होत आहे. वाद-विवादही होतात. त्यावर गावसकरांनी भाष्य केले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड याच्यासह सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला. मात्र, गावसकरांनी याला जास्त महत्त्व देणे टाळले.





