स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंतीनिमित्त नगर परिषदेच्या वैजिनाथ वाचनालयात गुरुवारी अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. निवृत्त शिक्षण केंद्रप्रमुख अधिकारी यू. बी. पारखे व ईश्वरलाल शिंपी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. धोंडिरामसिंह राजपूत यांनी सावरकर यांच्या सशस्त्र क्रांती मार्गाचा इतिहास सांगून ‘त्यांचे साहित्य म्हणजे धगधगते अग्निकुंड आहे,’ असे प्रतिपादन केले. या प्रसंगी ग्रंथालय सहायक संजय राजपूत, विजय पडवळ, कारभारी नवगिरे, अनिल शेजूळ, अविनाश गडाख, रवींद्र साळुंके आदी उपस्थित होते.









