नवी दिल्ली : ‘ सीबीएसई प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन आणि शिक्षणमंत्र्यांवर कोणतीही कारवाई न करणे हे दर्शवते की, त्यांना लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची नव्हे, तर केवळ आपल्या सरकारच्या अस्तित्वाची काळजी आहे’, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मूल्यांकन आणि कोएम्पीटीला कंत्राट देण्याच्या प्रकरणाची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी ते पहिल्या दिवसापासून करत आहेत.









